माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्या सतर्कतेमुळे वाचले गोमातेचे प्राण…

खड्ड्यात पडलेल्या गोमातेचे माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्या सतर्कतेमुळे वाचले प्राण…

सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर प्रतिनिधी 

प्रभाग क्रमांक २६ मधील भाग्यलक्ष्मी पार्क येथे एक गोमातेचे वासरू चरत असताना सेफ्टी टॅंक मध्ये पडल्याची माहिती स्थानिक महिला वर्ग व ज्येष्ठ नागरिक शेळवणे यांनी प्रभागाच्या माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांना दिले असता,  त्याची दखल घेत तात्काळ सोलापूर महानगरपालिका आयुक्त डॉ.श्री सचिन ओंबासे यांना संपर्क साधून घडलेल्या घटनेची माहिती सांगितल्याने तात्काळ आपत्कालीन, कक्ष येथील जेसीबी व रेस्क्यू टीम पाठवून देऊन याठिकाणी रेस्क्यू टीम व स्थानिक तरुण कार्यकर्ते यांच्या सहकार्याने गाईचे वासरू बाहेर काढण्यात आले.

वासराचे प्राण वाचल्यामुळे तेथील नागरिक यांनी आपले मनोगत व्यक्त केले की, नगरसेविका राजश्री चव्हाण यांचे आभार मानावे तेवढे कमीच आहे. गौरी आवाहन पूजेच्या दिवशी रात्रीच्या वेळेस समक्ष उभारून सदर गाईचे वासरूला जीवनदान दिले असून त्यांचे उपकार मानावे तेवढे कमीच आहे. आम्ही सदर बाबत संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना सांगून काहीच उपयोग झाला नाही.

परंतु नगरसेविका राजश्री चव्हाण यांना सांगितल्यानंतर जलद गतीने हालचाली होऊन एका निष्पाप वासरूचे प्राण वाचवले आहे. अशा कर्तव्यदक्ष,जागरूक,जनतेच्या हाकेला धावून येणाऱ्या नगरसेविका राजश्री चव्हाण ह्या आम्हाला लाभल्या हे आमचे भाग्य समजतो असे मनोगत व्यक्त केले त्यावेळी त्या नगरातील निवृत्त अधिकारी शेळकदे, सुनिता शेळवणे, मनीषा साबळे, सुनंदा कोळी, रश्मी भडकुंबे, कोमल साबळे, नागेश कोळी, नागनाथ शेळवणे, भाजपचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण आधी उपस्थित होते व केलेल्या कामाबद्दल व एका गोमातेचे प्राण वाचवल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *