सोलापूर जिल्ह्यात जलसंधारणाची कामे लवकरच सुरू – खा.प्रणिती शिंदे
विमानसेवेवरून खा. शिंदेंनी भाजपला केले टारगेट ; म्हणाल्या काँग्रेस पक्षच विमानसेवा सुरू करण्यासाठी घेणार पुढाकार
प्रतिनिधी सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.२५ फेब्रुवारी
सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मोहोळ, मंगळवेढा, अक्कलकोट तालुक्यातील दुष्काळी भागातील जलसंधारणाची कामे लवकरच सुरू केली जाणार आहेत, त्याची माहिती देण्यासाठी मंगळवारी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती यावेळी खासदार प्रणिती शिंदे या बोलत होत्या.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी खा. प्रणिती शिंदे यांनी मतदारसंघातील दुष्काळी भागातील पाणी टंचाईची समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले होते. दिलेल्या आश्वासनाची वचन पूर्तता करण्यासाठी म्हणून मोहोळ, मंगळवेढा आणि अक्कलकोट तालुक्यात दुष्काळी भागात जलसंधारणाच्या काम केले जाणार आहेत, या कामा करिता चेन्नई येथील एन्व्हायरमेंटलिस्ट फाउंडेशन ऑफ इंडिया (EFI) या संस्थेच्या वतीने सीएसआर अंतर्गत जलसंधारणाचे काम केले जाणार असल्याची माहिती खासदार प्रणिती शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दरम्यान, याबाबत अधिक माहिती देताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, सोलापूर जिल्हा हा पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील मंगळवेढा, सांगोला, पंढरपूर, मोहोळ, अक्कलकोट तालुक्यातील काही भाग अद्यापही दुष्काळीच आहे. या भागातील दुष्काळाचा डाग पुसावा यासाठी जलसंधारणाच्या योजना राबवाव्यात अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून केली जात आहे. दरम्यान, गेल्यावर्षी लोकसभा निवडणुकीचा प्रचार करत असताना मी मंगळवेढा तालुक्यातील 24 गावांचा पाणी प्रश्न सोडवण्यासह अक्कलकोट आणि मोहोळ तालुक्यातील दुष्काळी भागातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी आम्ही केंद्र सरकार, राज्य सरकार यांच्याकडे पाठपुरावा करत आहोत. त्याशिवाय काही पर्यावरणप्रेमी संस्थांच्या माध्यमातून देखील जलसंधारणाची कामे पूर्ण केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
या जलसंधारणाच्या कामासाठी खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नातून चेन्नई येथील पर्यावरणप्रेमी फाउंडेशन ऑफ इंडिया (EFI) ही संस्था सोलापूर जिल्ह्यातील जलसाठे पुनर्संचयित करण्याचे काम हाती घेणार आहे. ही सर्व कामे सामाजिक जबाबदारी अंतर्गत केली जाणार असून यासाठी शासनाकडून कोणत्याही प्रकारचा निधी घेतला जाणार नाही. सुरुवातीला या संस्थेकडून सोलापूर लोकसभा मतदार संघातील मोहोळ तालुक्यातील वाफळे, अक्कलकोट तालुक्यातील गाव तसेच मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मी-दहिवडी आणि डोंगरगाव या गावांतील जलसाठे पुनर्संचयित करण्याचे काम केले जाणार आहे.
तत्पूर्वी खा. शिंदे यांनी राज्यातील तसेच केंद्रातील भाजप सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. मागील सहा महिन्यांपासून आम्ही आकाशाकडे पाहतोय सोलापूरातून विमान कधी उडणार, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन विमानतळाचे लोकार्पण केले, पण विमानसेवा काही सुरू झाली नाही. मी देशाचे नागरी उड्डाण मंत्री यांच्याशी चर्चा करून विमानसेवा सुरू करण्याबाबत मागणी केली, आम्ही विमानसेवेसाठी प्रयत्न करतोय परंतु इगो’चा प्रश्न येतो, त्यात अडथळे आणण्याचा प्रयत्न होतो. येत्या काही दिवसात काँग्रेस पक्षाकडूनच विमानसेवा सुरू होईल असे सांगताना सत्ताधाऱ्याने अडथळे नाही, आणले तर असेही काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या.
लाडकी बहीण योजनेवरून त्यांनी सरकारला लक्ष्य केले, त्यांना विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम करायचे होते परंतु लाडकी बहीण पुढे आणून त्यांनी जे करायचे ते केले. राज्य सरकारची आर्थिक तिजोरी अडचणीत आल्याने आता या योजनेतील नऊ लाख लाभार्थी कमी होणार असल्याचे समजते. एकही योजना व्यवस्थित राबवली जात नसल्याची टीका त्यांनी केली.
असे होणार काम
१) तलावांमधील कचरा, अवशेष आणि अतिक्रमित वनस्पतींचे स्वच्छता कार्य
तलावांचे गाळनिर्मूलन आणि खोलीकरण करून पाणी साठवण क्षमता वाढवणे.
२) जलभरण विहिरी, पक्षी निवास द्वीपे आणि झिरप गटारांची निर्मिती करणे.
३) पावसाळ्यानंतर स्थानिक प्रकारच्या वनस्पती लावणे.
४) तलावात येणाऱ्या प्रवाहाचे आणि अतिरिक्त पाण्याच्या नियंत्रणाचे व्यवस्थापन केले जाणार आहे.
जनाधार असलेल्या नेत्यालाच शहर जिल्ह्याच्या अध्यक्षपदाची धुरा दिली जाईल खा.प्रणिती शिंदे यांचे संकेत
काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी, प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा सांभाळल्यानंतर राज्यभरातील जिल्हा आणि शहर पातळीवर देखील लवकरच बदल केले जातील, असे संकेत दिले होते. तेव्हा सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या अध्यक्षपदाची धुरा कोणाकडे देणार असा सवाल उपस्थित करताच , खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या ,”जनाधार असलेल्या नेत्यालाच शहर आणि जिल्ह्याच्या अध्यक्षपदाची धुरा दिली जाईल असे संकेत यावेळी दिले.
या पत्रकार परिषदेला , जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, जिल्हा कार्याध्यक्ष अँड नंदकुमार पवार, शहर अध्यक्ष चेतन नरोटे, मंगळवेढा तालुका अध्यक्ष प्रशांत साळे, मोहोळ तालुका अध्यक्ष सुलेमान तांबोळी, जिल्हा उपाध्यक्ष राजेश पवार, संदीप पाटील, मनोज यलगुलवार, रवी कोळेकर, तिरुपती परकीपंडला, ग्रामस्थ सुधाकर कांबळे, महादेव कोळी, मारुती बोरकडे, सत्यवान शिंदे, मोहन घोडके, राजेंद्र सर्जे, दिलीप वागज, पुष्पक सोनवले, मनोहर लिगाडे, प्रमोद भगत, प्रशांत पाटील, बजरंग शिंगाडे, पांडुरंग हेंबाडे, यांशवंत आकळे, सुखदेव मोरे, तानाजी मोरे, नंदकिशोर शिंदे, गणपत आकळे, बक्करभाई मुजावर, जयप्पा सपनाळे, अनिल मोरे, पिंटू शिंदे, शिवानंद कुरमुले, यांच्यासह इतर ग्रामस्थ उपस्थित होते.