त्या सहा नगरसेवकांना वैद्यांनी दाखवला नैवेद्य ; म्हणून झाली  फितुरी अन् गद्दारी – भाजप पदाधिकाऱ्यांचा खुलेआम आरोप..

त्या सहा नगरसेवकांना वैद्यांनी दाखवला नैवेद्य ; म्हणून झाली  फितुरी अन् गद्दारी – भाजप पदाधिकाऱ्यांचा खुलेआम आरोप..!

हद्दवाढ भागाच्या विकासासाठी जनता आ. सुभाष देशमुख यांच्या सोबत कायम असल्याचा केला निर्धार !

सोलापूर व्हिजन न्युज / प्रतिनिधी 

सोलापूर दि. २६ सप्टेंबर – सोलापूर, शहर दक्षिण पूर्व मंडलमधील हद्दवाढ भागाच्या विकासासाठी आ. सुभाष देशमुख यांनी आजपर्यंत भरीव निधी दिला आहे. प्रभाग क्र. १९ मध्ये रस्ते, पाणी, लाईट, पाईपलाईन आदी नागरी सुविधांसाठी बापूसाहेबांनी २२ कोटींपेक्षा जास्त निधी देत, याभागाचा चौफेर विकास केला. नागरिकांना सोई सुविधा उपलब्ध करून दिल्या. या शिवाय केंद्र शासनाच्या अमृत योजने अंतर्गत १३० कि.मी.ची भुयारी गटार योजना हद्दवाढ भागातील देसाई नगर, शांतीनगर, विनायक नगर, श्रमजीवी नीलम नगर, आशा नगर, नवले नगर, स्वागत नगर, माळीनगर, ताई चौक, आकाशवाणी परिसर, गवळी वस्ती, नेताजी शाळा, कलप्पा नगर, बोळकोटे नगर, नक्का वस्ती, जमादार वस्ती, नीलम नगर एम आय डी सी इ. भागात ३५ कोटी रुपये निधी आ. सुभाष देशमुख यांनी विशेष प्रयत्नाने हद्दवाढ भागासाठी आणला. नलिमनगरसह हद्दवाढ भाग ड्रेनेजलाईन काम प्रगतीपथावर आहे.पण पक्षातील काही माजी नगरसेवक, कार्यकर्ते यांनी आपल्या वैयक्तीक स्वार्थासाठी आ. सुभाष देशमुख यांचेवर बिनबुडाचे आरोप केले. विकासासाठी हद्दवाढ भागातील सुजाण मतदार कायमच आ. सुभाष देशमुख यांचे पाठिशी आहे.प्रभाग १९ मध्ये आ. सुभाष देशमुख यांच्याकडून काही कामं झालं नाही असे कारण देत सोमथन वैद्य यांना या मंडळींनी पाठिंबा दिला आहे.

      परंतु वस्तुस्थिती नाकारत त्यांनी हे आरोप केले आहेत. आमचे त्यांना आवाहन आहे, की त्यांनी प्रत्यक्ष येवून काम पाहून मगच बोलावे. सोमनाथ वैद्य यांचा दक्षिणच्या विकासात काहीही सहभाग नाही, सोलापूर भाजपाशी कोणताही संबंध नाही तरी त्यांना आगामी विधानसभेसाठी दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी द्यावी यासाठी श्रीनिवास करली, राजश्री अनिल चव्हाण, वरलक्ष्मी श्रीनिवास पुरूड, राजश्री अशोक बिराजदार, संतोष भोसले, जुगनबाई आंबेवाले आदींनी शिफारस दिली. कोणी कोणाला पाठिंबा द्यावा हा ज्याचा त्याचा वैयक्तीक प्रश्न आहे. पण स्थानिक आमदार सुभाष देशमुख यांनी २०१४ पासून हद्दवाढ भागाचा नियोजपूर्वक विकास केला असून त्याकडे जाणीवपर्वक दुर्लक्ष करत ही मंडळी केवळ स्वतचा सार्थ साधण्यासाठी आ. सुभाष देशमुख यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहे. पक्षाच्या वरिष्ठांनी या घटनेची दखल घेत या मंडळींवर कारवाई करावी, अशी मागणी भाजपचे माजी नगरसेवक बसवराज कैंगनाळकर , व्यंकटेश कोंडी, आणि अर्चना वडणाल यांनी केली आहे.

       या पत्रकार परिषदेस बसवराज कैंगनाळकर, व्यंकटेश कोंडी, नागनाथ शिवसिंगवाले, अर्जुन जाधव, जगदीश नागमल, लक्ष्मण यलदंडी, सतिश माळवे आदी उपस्थित होते.

सोमनाथ वैद्यांनी त्या सहा नगरसेवकांना नैवेद्य दिल्यामुळे फितुरी केली. 

ज्या आमदारांनी नगरसेवकांना महापालिकेत सभागृह नेता तसेच उपमहापौर पद दिले, प्रतिष्ठा आणि सर्व काही दिले. त्याच नगरसेवकांनी आमदार सुभाष देशमुखांवर आरोप करताना थोडा सुद्धा विचार करणे गरजेचे होते. व्यक्तिगत स्वार्थापोटी आमदार सुभाष देशमुख यांनी मदत केली नाही. म्हणून त्यांच्यावर रोष व्यक्त करण्यासाठी त्या नगरसेवकांनी कुटील डाव केला आहे. त्या नगरसेवकांना वैद्यांनी नैवेद्य दिल्यामुळे ही गद्दारी आणि फितुरी झाली आहे.

– अर्जुन जाधव , अध्यक्ष दक्षिण पूर्व मंडल सोलापूर शहर.

गुंड, तडीपार तसेच फसवणूक आणि भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यामध्ये अडकलेल्यांनी शहाणपण शिकवू नये..

आमदार सुभाष देशमुख यांनी या सर्व नगरसेवकांच्या कित्येक चुका पोटात घालून त्यांना नवी उर्जा आणि नवे पद देऊन सामाजिक कार्यात अग्रेसर राहण्याचे सल्ला दिला. परंतु या नगरसेवकांनी आपल्या मूळपिंडावर येत, फसवणूक करणे , दमदाटी करणे , पैशांची मागणी करणे असे अनेक गुन्हे केले त्यामुळे पार्टीचे आणि बापूंचे नाव खराब झाले. यामध्ये बापूंनी त्यांना कोणते सहाय्य केले नाही म्हणून त्यांच्यावर नाकर्तेपणाचा आरोप करणे चुकीचे आहे. अशा नगरसेवकांनी पार्टीला तसेच आमदारांना शहाणपण शिकवू नये. 

– नागनाथ शिवसिंगवाले, माजी दक्षिण मंडल अध्यक्ष.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *